Girish Mahajan sakal
नाशिक

Nashik News : आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकावरून महायुतीत मिठाचा खडा; गिरीश महाजन मानसिकता बदला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मतदार संघातील कामांसाठी निधी नसेल तर जमीन विकायची का? असा थेट सवाल करत राज्याच्या तिजोरीचे वास्तव समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या शाब्दिक खडा जंगीच्या पार्श्वभूमीवर सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी महाजन यांनी मानसिकता बदलावी व समाज भान राखून भाष्य करावे असा सल्ला दिला. (MLA Adv. Manikrao Kokate advised Mahajan to change his mentality and comment with social consciousness )

कोकाटे यांच्या सल्ल्यानंतर नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. सिन्नर मध्ये आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी मंजूर केला आहे. मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये निधीची मागणी केली, त्यावेळी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी नसल्याने आता काय जमिनी विकायच्या असा सवाल केला.

त्यानंतर महाजन व पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली त्यावेळी महाजन यांनी नको त्या कामांना निधी मंजूर होतो तर माझ्या मतदारसंघासाठी का नाही असा सवाल उपस्थित करताना सिन्नर मतदार संघातील आमदार कोकाटे यांच्या कामांचा उल्लेख केला. त्यावर नाशिकमध्ये आमदार कोकाटे यांनी भाष्य केले. कोणाच्या मतदार संघामध्ये काय विकास कामे चालू आहेत याची माहिती घेऊन मंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे व समाजभान राखावे असा सल्ला कोकाटे यांनी दिला. (latest marathi news)

मंत्रालयात मंत्र्यांनी आमदारांची कामे केली पाहिजे, याउलट मंत्री कोणाचेच ऐकत नाही आपल्या मंत्रालयात काय चालले आहे तेच कळत नाही. असा आरोप करताना आमदारांच्या फाईल अडवल्या तर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. अनेक मंत्री मंत्रालयात येत नाही लोकांची कामे होत नाही जनतेचे प्रश्न सोडविले जात नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केल्याने महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.

स्मारकाची घोषणा अर्थसंकल्पात

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे, त्यानंतरही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वक्तव्य करीत असतील तर हे वाईट आहे. विरोधच करायचा होता तर अर्थसंकल्पात घोषणा कशाला करायच्या असा सवाल करताना कोकाटे यांनी महाजन यांनी विषयाचे गांभीर्य पाळावे असा सल्ला दिला.

राघोजी भांगरे हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. राज्यात आदिवासी समाज ९ टक्के असून त्यांचे २२ आमदार आहेत भाजपमध्येही आदिवासी आमदार असल्याने समस्त आदिवासी समाज सरकारच्या विरोधात जाईल त्यामुळे असे वक्तव्य करू नये असा सल्ला आमदार कोकाटे यांनी महाजन यांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT