Vegetables  esakal
नाशिक

Vegetable Rate Hike : टोमॅटोला आले भाव, मिरचीचा ही ठसका; आठवडे बाजारात भाजीपाल्याची दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पावसाळा सुरू होताच हिरव्या भाज्यांचे दर कडाडले आहेत. टोमॅटोच्या भावाला लाली चढली आहे. मिरचीचा १०० रुपये किलो भावाचा ठसका नागरिकांच्या खिशाला जड झाला आहे. इतर भाजीपालाही ८० रुपये किलोपर्यंत पोचल्याने नागरिकांच्या खिशावर ताण पडत आहे. त्याचा पिंपळगावच्या आठवडे बाजारात नागरिकांच्या खरेदीवर परिणाम पाहायला मिळत आहे. (Price hike of vegetables in Pimpalgaon Baswant Week Market)

जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी पर्यत पोहचले नाही. त्यामुळे एप्रिल,मे महिन्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थोडीफार प्रमाणात लागवड केली होती.त्याचा परिणाम सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

यात प्रामुख्याने टोमॅटोचा भाव अधिक लालभडक झाला आहे.टोमॅटोचे भाव थेट ८० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचला आहे. तर भेंडी,गवार,वांदे,शेवगा यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या पुढे सरकले आहे. (latest marathi news)

पालेभाज्यांनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांच्या घराचे बजेट कोलमडले आहे. मे महिन्यात टोमॅटोचे दर ३० रुपये किलो होते.पण दराला लाली चढून ८० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.हिरव्या पालेभाज्यासुद्धा चांगल्याच कडाडल्या आहेत.

त्यामुळे सामान्यांच्या ताटातून भाजीपाला गायब होत आहे. अगं बाई...किती ही महागाई असे उद्गार भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या तोंडून निघत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT