National Panchayat Raj Award esakal
नाशिक

Nashik News : केंद्र शासन राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक हजार 385 ग्रामपंचायतींची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण झाली असून, १०० टक्के नोंदणी करणारा नाशिक जिल्हा राज्यात प्रथमस्थानी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (National Panchayat Raj Award)

२०२२-२३ आर्थिक वर्षासाठी हे पुरस्कार असून, २०२२-२३ वर्षाच्या कामकाजावर पंचायत राज संस्थांना पुरस्कार मिळणार आहे. केंद्र शासनातर्फे पंचायत राज अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना पुरस्कार दिले जातात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावर हे पुरस्कार देण्यात येतात.

यासाठी या वर्षी जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण झाली आहे. दोन ग्रामपंचायती नवीन असल्याने त्यांना अद्याप एलजीडी कोड प्राप्त नाही. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात असलेल्या सर्व एक हजार ३८५ ग्रामपंचायतींची १०० टक्के नोंदणी करण्यात आली आहे. (latest marathi news)

ही नोंदणी करण्यासाठी १० जुलै ही शेवटची मुदत होती. मात्र मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी यांच्या सनियंत्रणाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ९ जुलैला रात्रीच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण करून घेतल्याने नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT