Dam (file photo) esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात 10 धरणे कोरडीठाक; अवघा 8 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनची जिल्ह्याला प्रतीक्षा लागलेली असताना दुसरीकडे दुष्काळाचे संकट गंभीर झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३ धरणांपैकी तब्बल १० धरणे कोरडीठाक पडली असून, उर्वरित धरणांमध्ये अवघा ८.७१ टक्के साठा शिल्लक आहे. नाशिकच नव्हे, तर मराठवाड्याचीही तहान भागविणाऱ्या सर्वांत मोठ्या गंगापूर धरणात पाण्याने तळ गाठला आहे. (10 dams dry in district)

जिल्हाभरातील टॅंकरची संख्याही ३९८ वर पोहोचली आहे. मॉन्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. जूनचे सात दिवस उलटून गेले आहेत. शेतकरी, सामान्य जनतेला मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही.

उन्हाळा अधिक तीव्र असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, नद्या, नाले, झरे आटून गेले. जमिनीची भूजल पातळी खालावली असून, हातपंपांनाही पाणी येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता धरणांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली.

जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, गत आठवड्यात यातील १० छोटी-मोठी धरणे कोरडीठाक झालेली आहेत. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी २३.४३ टक्के, गौतमी गोदावरी १०.६५ टक्के, पालखेड ३३.०८ टक्के, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के, दारणा ४.२९ टक्के, भावली ० टक्के, मुकणे २.५९ टक्के, वालदेवी ० टक्के. (latest marathi news)

नांदूरमध्यमेश्वर ९८ टक्के, चणकापूर ४.५७ टक्के, हरणबारी ७.८० टक्के, केळझर ०.५२ टक्के, गिरणा १२.३५ टक्के, तर माणिकपुंज ० टक्के अशी काही महत्त्वाची धरणे मिळून ८.७१ टक्के असा साठा उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८.५९ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सद्यस्थितीत ३६२ गावे व ९४१ वाड्या अशा एकूण एक हजार ३०३ गाव-वाड्यांना ३९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय, तर ३८४ खासगी टॅंकरचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या ६४ गावांना तसेच १४३ ठिकाणी टॅंकरसाठी २१३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (५६), चांदवड (५), देवळा (३३), कळवण (२१), मालेगाव (५०), नांदगाव (१०), पेठ (१३), सुरगाणा (१४), येवला तालुक्यासाठी (६) विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

मालेगाव, येवल्यात टॅंकरचे अर्धशतक

तालुकानिहाय विचार करता आठवड्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मालेगाव व येवला तालुक्यांत टॅंकरने अर्धशतक पार केले असून, येथे अनुक्रमे ५६ व ५७ टॅंकरद्वारे तहान भागविली जाते. सिन्नर व बागलाण तालुक्यांतही टॅंकरची संख्या वाढत आहे. येथे अनुक्रमे ४२ व ४६ टॅंकर सुरू आहेत. चांदवड (३३), देवळा (३२), इगतपुरी (१६), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा (१८), त्र्यंबकेश्वर (४) येथे टँकर सुरू आहेत. हे टॅंकर सात लाख १६ हजार ५०१ लोकांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT