प्रकाश शिरसाट  esakal
उत्तर महाराष्ट्र

खरवड गावाला सात वर्षांपासून पाणी पुरवतोय शेतकरी

सम्राट महाजन

तळोदा (जि. नंदुरबार) : खरवड (ता. तळोदा) गावातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रकाश शिरसाट हे पुढे आले असून गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवत आहे. त्यामुळे प्रकाश शिरसाट यांच्या या दातृत्वाची पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

खरवडची (ता. तळोदा) लोकसंख्या जवळपास एक हजार तीनशे असून गावाला काही वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन सरपंच जिजाबाई मोरे यांनी गावासाठी चार कूपनलिका मंजूर केल्या होत्या, परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांना पाणी लागले. त्या कूपनलिकांमध्ये नियमित वापरल्या जाणाऱ्या अश्‍वशक्तीचा विद्युत पंप टाकून गावातील घरापर्यंत पाणी पोचविण्यात आले.

कालांतराने कूपनलिकांमधील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली. त्याला पर्याय म्हणून कूपनलिकांमध्ये सिंगल फेज विद्युतपंप टाकण्यात आले व त्या सिंगल फेज विद्युत पंपाद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. खरवड गावातील जवळपास ४५० घरांपैकी ३६० घरांना नळ कनेक्शन देत त्यातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तसेच गावाच्या चारही बाजूला चार ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले, जेणेकरून घरापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास सार्वजनिक नळांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होईल.

दरम्यान काही वर्षानंतर पुन्हा खरवड ग्रामस्थांना पाणी टंचाई भेडसावू लागली. यासाठी आमदार यांनी देखील कूपनलिका केली, मात्र पाणी न लागल्याने ती देखील वाया गेली. गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गावातील रहिवासी प्रकाश शिरसाट पुढे आले. प्रकाश शिरसाट स्वतः शेतकरी असून ते ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. गावातील पाण्याची समस्या त्यांना अवगत होती. त्यांनी स्वतःहून आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करीत पाण्याची समस्या निकाली काढली.

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी व्हावे प्रयत्न

गावातील लोकसंख्येच्या विचार करता कूपनलिकेद्वारे किती दिवस गावाची तहान भागली जाणार असा या प्रश्नाने ग्रामस्थ चिंतेत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासकीय स्तरावरून उपाययोजना आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

खरवड ग्रामस्थांना काही वर्षांपूर्वी कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागल होते. त्यामुळे ग्रामस्थांचे खूप हाल झालेत. ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी माझ्या शेतातील कूपनलिका समर्पित केली असून गेल्या सात वर्षांपासून ती कूपनलिका ग्रामस्थांची तहान भागवत आहे.

- प्रकाश शिरसाट, शेतकरी, खरवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT