पीकविमा नोंदणीत चंद्रपूर आघाडीवर Sakal
विदर्भ

Crop Insurance : पूर्व विदर्भात पीकविमा नोंदणीत चंद्रपूर आघाडीवर; १० लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून एक रुपयांत पीकविम्याची योजना सुरू केली आहे. केवळ एक रुपयांत पीक संरक्षित होत असल्याने पीकविमा काढण्यासाठी खरीप हंगामापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. पूर्व विदर्भात आतापर्यंत १० लाख ९८ हजार ७७७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ६०८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. पूर्व विदर्भात पीक नोंदणीत चंद्रपूर जिल्हा आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यात २ लाख ३७ हजार ६२७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. तिसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७९९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्गाचा लहरीपणा याचा मोठा फटका पिकांना बसत आहे. यासाठी राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हेक्टरी रकमेची अटही शिथिल करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने केवळ एक रुपयांत पीकविमा योजना सुरू केली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्हा पीकविमा नोंदणीत आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ६०८ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यापाठोपाठ नागपूर जिल्हा आहे.

नागपूर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार ६२७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीकविमा काढला. वर्धा जिल्हा पीकविमा नोंदणी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७९९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

भंडारा जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ५५२, गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ७५८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. गडचिरोली जिल्हा पीकविमा नोंदणीत मागे आहे. सध्या या जिल्ह्यात ६६ हजार ४३३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. आतापर्यंत पूर्व विदर्भात १० लाख ९८ हजार ७७७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

खरीप हंगामात एक जुलैपासून पीकविमा काढण्यास सुरवात झाली. १५ जुलै पीकविमा काढण्याची मुदत होती. मात्र, पीकविमा योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने झाली. याबाबत कृषिमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले होते. त्याची दखल घेत आता ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत आहे.

पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र, धानपट्ट्यात अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविमा काढून पीक संरक्षित करण्याची गरज आहे. योजनेला मुदतवाढ मिळाल्याने आकडा अजून वाढणार आहे.

- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT