household budget Sakal
नागपूर

household budget : दसरा, दिवाळीवर महागाईचे सावट...गृहिणींचे बजेट कोलमडणार,सामान्यांच्या खिशाला कात्री

household budget : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीत तेल, हरभरा डाळीनंतर साखर आणि तांदळाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसण्याचे संकेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खाद्य तेल, हरभरा डाळीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता साखर आणि तांदळाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली आहे.

सोबतच साखरेच्या उत्पादनात यंदा दहा लाख टन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तांदूळ आणि साखरेच्या दरात प्रतीकिलो दोन रुपये किलो वाढीचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे ऐन दसरा, दिवाळीच्या सणात महागाईचा फटका सामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

शेतमालाच्या किंमती नियंत्रणात राहाव्या यासाठी केंद्र सरकारकडून नेहमीच आयात-निर्यात धोरणात बदल केला जातो. ज्याचा थेट परिणाम किंमतींवर होत असतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या जुलै २०२३ पासून तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे. ती बंदी आता उठवण्यात आली. त्याचा परिणाम आता तांदळाच्या दरांवर होणार असल्याची शक्यता आहे.

देशातील सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा पुरेसा साठा असताना आणि किरकोळ किंमतीही नियंत्रणात असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने पांढऱ्या तांदळावरील शुल्क १० टक्के कमी करताना बिगर बासमती पांढऱ्या तांदळाला निर्यात शुल्कातून सूट दिली. दरम्यान निर्यात होणाऱ्या या तांदळावर किमान निर्यात मूल्यासोबत निर्यात शुल्काचीही अट असणार आहे.

केंद्र सरकाने आधी असलेले किमान निर्यात मूल्य २० टक्क्यावरून १० टक्के करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरच निघण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, ग्राहकांचे खिसे हलके होणार असून येत्या काही दिवसांत तांदळाचे दर वाढण्याची चर्चा बाजारात आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

मागील वर्षी ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र, कृषी विभागाच्या अंदाजानुसार हेच उत्पादन ९० ते १०२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविली आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारकडे साखरेचा साठाही कमी झाला आहे. त्यामुळे साखर ४५ रुपये किलोवर जाण्याचा अंदाज आहे.

तेल, हरभरा डाळीनंतर आता तांदूळ आणि साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार असून, दिवाळी आणि दसऱ्याच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे दिसत आहे. तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आणि साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. बाजारात सध्या थांबा आणि पहा अशा भूमिकेत व्यापारी आहेत.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT