turmeric crop  sakal
नागपूर

बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका

संतोष गिरडे

शिरपूर जैन : अचानक येणारा पाऊस, धुके त्यात तीव्र थंडीची लाट अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची भिस्त असलेल्या हळद पिकाच्या उत्पादनाला फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच रब्बीचे गहू, हरभरा या पिकांचे सुद्धा उत्पन्न घटणार असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.

सध्या दिवसा ऊन तर रात्रीला थंडीचा पारा चांगलाच खाली येत आहे, मध्येच धुके त्याचा विपरीत परिणाम पिकावर होऊ लागल्याने तुरीचे कमालीचे घटलेले उत्पन्न त्यानंतर हळद सुद्धा करपत आहे. तर गहू देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याची थंडी, धुके मध्येच पाऊस यामुळे एकूणच पिकावर विपरीत परिणाम होत असून खरिपातील सोयाबीन पीक हातचे गेले तर आता तुरीचे उत्पन्न अगदीच मोजके झाले.

आता शेतात उभे असलेले गहू, हळद पीक देखील वातावरणातील बदलामुळे नुकसानग्रस्त होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होणार आहे. वातावरणातील कमालीच्या बदलामुळे हळदीची पाने वळू लागली आहेत तर गहू कमजोर होत आहे, त्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार? सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण मेन्शन, 'या' तारखेला सुनावणी

Big Billion Days : खुशखबर! नथिंग 5G फोन मिळतोय 12,999 रुपयांत; एकदम ब्रँड फीचर्सच्या स्मार्टफोनवर महा डिस्काऊंट

Jalgaon Accident News : ट्रकला दुचाकी धडकल्याने बापलेकाचा मृत्यू; पत्नी गंभीर

Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीप्रकरणी 30 जणांना अटक; इमामनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

SCROLL FOR NEXT