wadettiwar spoke truth about rahul gandhi India alliance should think election vote chandrasekhar bawankule Sakal
नागपूर

Chandrasekhar Bawankule : राहुल गांधींबाबत वडेट्टीवार खरे बोलले; २८ पक्षांच्या इंडिया आघाडीने विचार करावा - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जो वक्ता नाही तो नेता कसा बनू शकेल, असे जाहीर विधान करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अनावधानाने का होईना खरे बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या की नाही हे इंडिया आघाडीने ठरवावे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अर्थ काढावा. २८ पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनीसुद्धा याचा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर, सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला पुढे नेण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार देशहिताच्या विचाराने भाजपासोबत आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, यातच भारताचे व राष्ट्राचे कल्याण आहे, असे सर्वांचे मत झाले आहे.

पक्ष आणि चिन्ह हा वाद यात नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादावार बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीत लोकांमधून विजयी झालेले आमदार-खासदार ज्या बाजूने असेल त्यांचा तो पक्ष असेल, असे माझे मत असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय अखेर निवडणूक आयोगाला घ्यायाचा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT