Rahul Gandhi News : पंतप्रधान मोदींचे जम्मूतील हल्ल्यांकडे दुर्लक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयबद्दल अभिनंदन स्वीकारण्यात व्यस्त आहे परंतु त्यांना जम्मू व काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.

गेल्या तीन दिवसांमध्ये जम्मू व काश्मीरमधील रियासी, कठुआ व डोडा या भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले. कटरा येथे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहे. या तीन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले परंतु पंतप्रधान लोकसभा निवडणुकीनंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. देश यासंदर्भात पंतप्रधानांकडून उत्तर मागत आहे. भाजपच्या सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कां पकडले जात नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.