इंग्रजांच्या एका निर्णयामुळे बंजारा समाज देशोधडीला लागला

संतोष कानडे

बंजारा

बंजारा समाज हा संपूर्ण देशभरात तांड्यांमध्ये विभागून उपजीविका भागवणारा समाज आहे

Banjara Community

भटक्या व विमुक्त

भटक्या व विमुक्त जमातींमध्ये बंजारा समाजाचा समावेश होतो. यांची राज्यात साधारण दोन कोटी लोकसंख्या आहे

Banjara Community

हडप्पा

हडप्पा आणि मोहंजोदारोच्या सिंधू संस्कृतीमध्ये बंजारा समाजाचे पुरावे सापडलेले आहेत

Banjara Community

गोर बंजारा

त्याकाळी व्यापार करणारे गोर बंजारा समाजाचे लोक होते. वाणिज्य करणारे म्हणून त्यांना वनज म्हणत. त्यातूनच पुढे बंजारा शब्दाची निर्मिती झाली

Banjara Community

सिंधू संस्कृती

बंजारा स्त्रीयांची आभूषणं ही सिंधू संस्कृतीची प्रतिकं असल्याचं अभ्यासक सांगतात

Banjara Community

व्यापारी

वाहतूक, दळणवळवण याच्याशी संबंधित कामं बंजारा समाज करी. अगदी मध्य युगापर्यंत ही जमात व्यापारी होती

Banjara Community

लमाणी

याशिवाय लमाणी हा शब्द लवण शब्दापासून आला. लवण म्हणजे मीठ आणि मीठ वाहणारे लमाणी

Banjara Community

तिबेट

भारतामध्ये १३९६ मध्ये पडलेल्या दुष्काळात बंजारा समाजाने चीन, तिबेट, ब्रह्मदेश, इराण, काबुल इथून धान्य आणून लोकांना जगवलं,त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळाली

इंग्रज

आठराव्या शतकामध्ये इंग्रजांचं भारतात प्राबल्य वाढल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या

रेल्वे

पक्के रस्ते आणि त्यानंतर १८५३ साली आलेल्या रेल्वेमुळे बंजारा समाजाचा व्यवसाय धोक्यात आला

पुढे इंग्रजांनी जंगलातील गोंद चारोळी आणि मोळ्या विकण्यावर बंदी घातली, त्यामुळे बंजारा समाज देशोधडीला लागला

गुन्हेगारी

त्यामुळे बंजारा समाज गुन्हेगारीकडे वळला, स्वातंत्र्यानंतर १९५२ साली बंजारा समाजावरचा हा शिक्का पुसला गेला.

प्रगती

वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे महान नेते बंजारा समाजात होऊन गेले, त्यामुळे समाजाने प्रगती केली