Kiran Mahanavar
टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही या मालिकेपासून आपल्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहेत.
या दौऱ्यावर वनडे आणि टी-२० मालिकेत दोन नवे कर्णधार पाहायला मिळतील.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याने वनडे मालिकेतून विश्रांती घेणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान एका वृत्तानुसार, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती घेणार असल्याचे सांगितले आहे.
हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवताना दिसत आहे.
परंतु आता हार्दिकच्या वनडे मालिकेत खेळण्याबाबत सस्पेंस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआय टेन्शनमध्ये दिसत आहे.