विराट कोहलीची सुरक्षा धोक्यात! जाणून घ्या कारण

Kiran Mahanavar

एलिमिनेटर सामना

आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.

विराट कोहली

एकीकडे करोडो क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे आरसीबीला विराट कोहलीच्या सुरक्षेची चिंता आहे.

सराव सत्र रद्द

एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेचा विचार करत आरसीबीने सराव सत्र रद्द केले असून पत्रकार परिषदही घेतली नाही.

४ जणांना अटक

एलिमिनेटर सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळावरून दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी ४ जणांना अटक केली.

व्हिडिओ आणि मेसेज

अहमदाबाद विमानतळावरून अटक केलेल्या संशयितांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे संशयीत व्हिडिओ आणि मेसेज सापडले आहेत.

राजस्थान आणि बंगळुरू

याबाबतची माहिती राजस्थान आणि बंगळुरू संघाला देण्यात आली होती, ज्यावर राजस्थानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिकृत वक्तव्य

बंगळुरूने सराव सत्र का रद्द केले हे कोणत्याही अधिकृत वक्तव्यात सांगितले नसले तरी विराटच्या सुरक्षेला लक्षात घेऊन सराव सत्र रद्द करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

SRH विरुद्धचा सामना जिंकून श्रेयसने रचला इतिहास!

येथे क्लिक करा