रोहित कणसे
दही आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, पण पावसाळ्यात दही खाऊ नये असे सांगितले जाते. आज आपण जाणून घेऊया की पावसाळ्यात दही का खाऊ नये
दह्याचे उन्हाळा आणि पावसाळ्यात सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या ऋतूत हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.
आयुर्वेदात दही हे हळूहळू पचणारे अन्न मानले जाते. पावसाळ्यात लोकांच्या शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावते आणि पचनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत दही खाल्ल्याने अपचन होऊ शकते.
पावसाळ्यात दही खाल्ल्यास ताप येण्याची शक्यता असते, त्यामुळे या ऋतूत ते खाणे योग्य मानले जात नाही.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खाल्ल्याने सांधेदुखी होऊ शकते. या ऋतूत दही खाणे हाडांसाठीही हानिकारक ठरू शकते.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही सेवन करणे चांगले नसते कारण पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांमध्ये बॅक्टेरिया अधिक वाढतात, ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते
पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत या ऋतूत दही खाणे टाळावे.
पावसाळ्यात दही खाल्याने त्वचेशी संबंधित समस्या जसे की फोड आणि पिंपल्स होऊ शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्या होऊ शकते, त्यामुळे या ऋतूत दही खाणे टाळावे.
पावसाळ्यात करटोरीची भाजी खाल्ल्यास अनेक आजार राहतात दूर