सकाळ वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
अशातच विधानसभेमध्ये महायुतीला म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या तिघांना काही चुकांमुळे फटका बसू शकतो असे म्हटले जात आहे.
लोकसभेमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी महायुती विरोधात गाव पातळीवर बैठका घेऊन प्रचार केला होता. यंदा असाच प्रकारचा प्रचार ते विधानसभेतही करतील अशी चर्चा आहे.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघातामुळे पडला. येत्या निवडणुकीमध्ये याचा खूप मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो असे म्हटले जात आहे
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली. मात्र याचं श्रेय कोण घेणार यावरूनच तीन पक्षांमध्ये श्रेय वादाचा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे याचा फटका महायुतीला निवडणुकीमध्ये बसू शकतो असे चित्र आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मीच फोडले असे विधान एका मुलाखतीमध्ये केले होते. त्या विधानाची चर्चा अजूनही महाराष्ट्रात आहे. त्याचा फटका हा महायुतीला येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो असे म्हटले जात आहे
महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशातच ज्या प्रकारची टीका महायुतीचे काही नेते या दोघांवर करत आहेत ते पाहता याचा फटका थेट महायुतीला बसू शकतो अशी चर्चा आहे
सध्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीचा फटका हा थेट महायुतीला बसेल अशी चर्चा आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.