Payal Naik
चहाशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार चहा पितो.
त्यात ग्रीन टी, ब्लॅक टी, मिल्क टी असे प्रकार आहेत. मात्र त्यातील दुधाचा चहा सगळ्यात जास्त घेतला जातो.
मात्र दुधाचा चहा फार काळ उकळत ठेवू नये. यामागचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?
दुधाचा चहा फक्त ४ ते ५ मिनिटं उकळायला हवा. त्यापेक्षा जास्त उकळल्याने त्यात टॅनिनचं प्रमाण वाढतं.
असा चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे ऍनिमिया होण्याचा धोका असतो.
यासोबतच असा चहा जास्त ऍसिडिक असतो. शिवाय त्यात कॅन्सरचा धोका निर्माण करणारं ऍक्रीलायमाईड तयार होतं.
अशा चहाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
यासोबतच दुधाचा चहा जास्त उकळल्याने दुधातील प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व नष्ट होतात.
शरीराला किमान किती तासाची झोप हवी ठाऊक आहे?