T20 वर्ल्ड कपसह मायदेशात परतलेल्या टीम इंडियाचा 'विजयोत्सव'

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२४

भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

Team India | X/BCCI

अंतिम सामन्यात विजय

बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं.

Team India | Sakal

चक्रीवादळ

मात्र, या विजयानंतर काही दिवस भारतीय संघ बार्बाडोसला असलेल्या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे तिथेच अडकला होता.

Suryakumar Yadav | X/BCCI

मायदेशी परतला

अखेर भारतीय संघ ४ जुलै रोजी पहाटे बीसीसीआयने सोय केलेल्या स्पेशल विमानाने मायदेशी परतला.

Team India | Sakal

विजयोत्सव

मायदेशी परतल्यापासूनच दिवसभर भारतीय संघ विजयोत्सव साजरा करताना दिसला.

Rohit Sharma | X/BCCI

पंतप्रधानांची भेट

दिल्लीत परतल्यानंतर आधी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Team India with PM Narendra Modi | X/BCCI

मुंबईकडे रवाना

मोदी यांच्याबरोबर संवाद साधल्यानंतर भारतीय संघ दुपारी मुंबईकडे रवाना झाला. मुंबईत पोहचल्यानंतरचे दृश्य मात्र थक्क करणारी होती. हजारो चाहत्यांचा ताफा भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होता.

Rohit Sharma - Sanju Samson | X/BCCI

विजयी मिरवणूक

मुंबईत परतल्यानंतर नरिमन पाँइंट्स ते वानखेडे स्टेडियम अशी भारतीय संघाची ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Jasprit Bumrah | X/BCCI

वानखेडे स्टेडियमवर सत्कार

यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडूंचा सत्कार सोहळा झाला, यावेळी संपूर्ण वानखेडे स्टेडियमही चाहत्यांच्या उपस्थितीने भरलेले होते.

Team India | Sakal

हरभजन सिंगची कमाई किती? जाणून घ्या

Harbhajan Singh | Instagram
येथे क्लिक करा