Anuradha Vipat
'सैराट' या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारत अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू आणि तिचे वडील लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत .
मुलाखतीत मुलीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता, ती ठरवेल ते चालेल, पण तिने सांगितल्यावर आम्ही निर्णय घेऊ असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे
वडिलांच्या तोंडून हे उत्तर ऐकल्यानंतर रिंकूनेही त्यांना विचारलं, “मला एखादा मुलगा आवडतो म्हटल्यावर तुम्ही त्याच्याशी लग्नासाठी होकार द्याल का?
यावर ते म्हणाले, या क्षेत्रातील गोष्टी ज्याला कळू शकतील, तोच तिला समजून घेऊ शकतो. जर मुलात हे गुण असतील तर आमची काहीच हरकत नाही
सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या बऱ्याच मुलाखती झाल्या होत्या
या मुलाखतींमध्ये रिंकूचा साधा आणि तितकाच थेट स्वभाव पहायला मिळाला आहे