'वन नेशन, वन इलेक्शन'चे फायदे-तोटे काय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

धोरणाचे फायदे

सरकारी कर्मचाऱ्यांना वारंवार निवडणूक कार्यात अडकून राहावं लागणार नाही.

विकासावर लक्ष

राजकीय लोकांना विविध निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करता येईल.

भ्रष्टाचार कमी

निवडणूक प्रक्रियेतील खंडणी आणि भ्रष्टाचारासारखे आर्थिक गुन्हे कमी होतील

पक्ष क्वालिटी काम

जनमानसावर प्रभावासाठी पक्ष क्वालिटी काम करतील. कारण त्यांना दीर्घ काळानंतरच पुढील संधी मिळेल.

खर्च कमी

एकत्रितपणे निवडणुका पार पाडण्यासाठी खूपच कमी खर्च येतो, हे फक्त सध्या ओडिशात होतं.

धोरणाचे तोटे :

वारंवार निवडणुका होत नसल्यानं राजकारणी लोकांना जनतेत कमी वेळा जावं लागेल. त्यामुळं जनतेकडं कनाडोळा करण्याचं प्रमाण वाढेल.

मतदारांमध्ये संभ्रम

मतदारांमध्ये कायम संभ्रम राहिलं, त्यासाठी निवडणूक आयोगाला मतदानाबाबत नवंनवे बदल घडवून आणावे लागतील.

प्रादेशिक पक्ष संपतील

प्रादेशिक पक्षांसाठी संधी कमी होईल, तर राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व राहील. कारण केंद्रीय निवडणुकांच्या अनुषंगानंच स्थानिक निवडुका होतील.

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात

यामुळं राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. कारण देशविघातक शक्ती एकाच वेळी होणाऱ्या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.