Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे अफझलखानाचा वध.
शिवरायांचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने आदिलशहाने अफझलखानाची नियुक्ती केली होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हुशारीने खानाचा वध केला.
दरम्यान, या अफझलखान आणि त्याच्या सैन्याशी झालेल्या लढाईत मोलाची भूमिका बजाबवलेल्या शूर सरदारांना शिवाजी महाराजांनी बक्षीसं दिली होती, त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना कठोर शिक्षाही केली.
शिक्षा झालेल्या सरदारांमध्ये खंडूजी खोपडे देखील होता. याचा उल्लेख शिवकाल या पुस्तकातही करण्यात आला आहे.
खंडूजी खोपडे फितूर झाला होता. त्यानी लाच घेतली असल्याचे म्हटले जाते.
खंडूजी खोपडेनी अफझलखानाचा मुलगा फाजलखान याला सुरक्षितपणे कऱ्हाडला पोहचवण्यासाठी मदत केली होती. असा उल्लेख शिवचरित्र प्रदीप, जेधे करीना यात करण्यात आला आहे.
ही गोष्ट शिवाजी महाराजांना समजल्यानंतर त्यांनी खंडोजी खोपडेला पकडून आणून त्याला कठोर शिक्षा सुनावली होती.
शिक्षा म्हणून शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडेचा एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली होती. (Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade)