पुजा बोनकिले
अनेकांना कंटाळा आला की जांभई येते असा एक सर्वसामान्य समज आहे.
पण जांभई दिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं.
पण हे पाणी नेमकं का येतं? हे जाणून घेऊया.
जांभई आल्यानंतर आपले डोळे किंचितसे बारीक होतात.
तसंच तोंड उघडल्यामुळे चेहऱ्यावरील इतर भागांवरही ताण पडतो.
यात आपल्या दोन्ही भुवयांमधील भागदेखील ताणला जातो.
या भागामध्ये डोळ्यातून पाणी आणण्याचं कार्य करणाऱ्या ग्रंथी असतात.
जांभई देताना या ग्रंथींवर परिणाम होतो.
यामुळे जांभई दिल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं.