Anuradha Vipat
अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यास बॉलिवूड सोडणार का, असा प्रश्न कंगनाला मुलाखतीत विचारण्यात आला होता
यावर कंगनाच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाबाबत खूप लोक नाराज होतील असं तिने सांगितलं आहे
पुढे कंगना म्हणाली, मला अनेक दिग्दर्शक म्हणतात की आमच्याकडे एक चांगली हिरोइन आहे. तुम्ही ही इंडस्ट्री सोडून जाऊ नका
मी अभिनय चांगला करते, पण ठीक आहे, ते सुद्धा एकप्रकारे कौतुक झालं. मी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते असंही पुढे कंगना म्हणाली