Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला ७ जुलैपासून होणार सुरूवात, 1000 यज्ञांचे पुण्य देणाऱ्या यात्रेचे महत्त्व घ्या जाणून

Jagannath Puri Rath Yatra 2024: ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरीची रथयात्रा ही जगभरात प्रसिद्ध आहे.
Jagannath Rath Yatra 2024
Jagannath Rath Yatra 2024esakal

Jagannath Rath Yatra 2024 : ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरीची रथयात्रा (Jagannath Rath Yatra 2024) ही जगभरात प्रसिद्ध आहे. भगवान जगन्नाथांची ही रथयात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही संपन्न होणार आहे. येत्या ७ जुलैपासून या रथयात्रेला सुरूवात होणार असून ही रथयात्रा दोन दिवस रंगणार आहे. ७ आणि ८ तारखेपर्यंत ही यात्रा पार पडणार आहे.

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीपासून ही रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेच्या दरम्यान भगवान जगन्नाथ आपला मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर बसतात. या त्रिमूर्तीची ही रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते. असे मानले जाते की, या रथयात्रेचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्याने १००० यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचे महत्व काय? ते सांगणार आहोत.

Jagannath Rath Yatra 2024
Ashadhi Wari 2024: संत तुकाराम महाराजांचा रथ ओढणार गुलाब अन् मल्हार; जाणून घ्या बैलजोडीची निवड कशी केली जाते?

भगवान जगन्नाथ आणि रथयात्रा

भगवान जगन्नाथ यांचे मुख्य पूजास्थान हे ओडिशा राज्यातील पुरीमध्ये आहे. पुरी हे शहर ओडिशा राज्यातील अतिशय महत्वाचे शहर असून, याला पुरूषोत्तम पुरी असे ही म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या युगल मूर्तीचे प्रतिक स्वत: भगवान श्री जगन्नाथ आहेत. विशेष म्हणजे श्रीकृष्ण ही त्यांचाच अंश आहे.

Jagannath Rath Yatra 2024
Jagannath Rath Yatra 2024esakal

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र (बलराम) आणि सुभद्रा यांच्या अर्धनिर्मित लाकडी स्वरूपातील मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. या मूर्तींची निर्मिती इंद्रद्युम्न राजाने केल्याचे सांगितले जाते. जगन्नाथांची ही भव्य रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरीमधून सुरू होते. २ दिवस ही रथयात्रा चालते. (Jagannath Rath Yatra 2024)

अशी संपन्न होते रथयात्रा

भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा या रथयात्रेच्या द्वारे सामान्य जनतेमध्ये जातात. ही रथयात्रा दशमी तिथीला संपते. या रथयात्रेमध्ये सर्वात पुढे श्री बलरामजी हाती ताल झेंडा घेऊन अग्रभागी चालतात. बलरामजींच्या मागे पद्मध्वज घेऊन जाणाऱ्या रथावर देवी सुभद्रा आणि सूदर्शन चक्र आहेत. त्यानंतर, सर्वात शेवटी भगवान श्री जगन्नाथ गरूड ध्वजावर विराजमान होऊन रथयात्रेत चालतात.

जगन्नाथ रथयात्रेचे महत्व काय?

भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेबद्दल स्कंदपुराणात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे, या रथयात्रेत जो व्यक्ती श्री जगन्नाथ यांच्या नामाचा जयघोष करत, किर्तन करत गुंडीचा नगरापर्यंत जातो, तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो, असे सांगितले जाते.

तसेच, जो व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या रथयात्रेत ज्या लोकांना भगवान श्री जगन्नाथ यांची सेवा करण्याचे पुण्य मिळते, ते लोक भाग्यवान असतात, अशी देखील धार्मिक मान्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com