केजरीवालांना रोहिंग्यांना मोफत फ्लॅट्स द्यायचे होते; केंद्राने दिले प्रत्युत्तर

दिल्लीतील अधिकाऱ्यांनी कोणाच्या इशाऱ्यावर हे केले?
Arvind Kejriwal and Anurag Thakur News
Arvind Kejriwal and Anurag Thakur NewsArvind Kejriwal and Anurag Thakur News
Updated on

Arvind Kejriwal and Anurag Thakur News नवी दिल्ली : रोहिंग्या निर्वासितांच्या घरांच्या मुद्द्यावरून दिल्ली आणि केंद्र सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा फेरा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Arvind Kejriwal) यांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारला रोहिंग्यांना मोफत फ्लॅट द्यायचे होते, असे म्हणत पलटवार केला आहे. आप सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप करीत त्यांनी रोहिंग्यांबद्दल सहानुभूती का आहे, असा सवाल केला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडे कोणतेही खाते नाही. मात्र, ते रोहिंग्यांना सर्व सुविधा देण्याचे काम करतात. केजरीवाल सरकार आणि अधिकारी रोहिंग्यांना ईडब्ल्यूएस फ्लॅट देण्याबाबत का बोलले? त्यांचे आरोग्यमंत्री उत्तर देत नाही. दारू धोरणावर उत्तर देऊ नाही. मोफत रेवडी वाटतात. आता रोहिंग्यांना मोफत फ्लॅट देणार होते. व्होट बँकेच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी खेळायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत, असेही अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले.

Arvind Kejriwal and Anurag Thakur News
1,000 कोटी कशाला म्हणते भाऊ? Bigg Boss 16 साठी सलमान खान घेतोय एवढी रक्कम

दिल्लीतील अधिकाऱ्यांनी कोणाच्या इशाऱ्यावर हे केले? खोटे आरोप करून पळून जाण्याचे काम ते करतात. पेपर खरं बोलतो. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) उत्तर देतील का?, असे पत्र दाखवत अनुराग ठाकूर यांनी विचारले. केंद्रीय मंत्र्यांनी आप आमदार अमानतुल्ला खान यांचे नाव घेत ते स्वतः रोहिंग्या घुसखोरांना रेशनचे वाटप करतात की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करतात, असा सवाल केला.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून रोहिंग्या मुस्लिमांना फ्लॅटमध्ये पाठवण्याचा निर्णय कोणाच्या सूचनेनुसार घेतला होता, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही रोहिंग्या मुस्लिमांना फ्लॅटमध्ये हलवण्याचा निर्णय घेतलेला नाही. केंद्रानेही हा निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. मग हा निर्णय कोणी घेतला? ज्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सिसोदिया यांनी केली आहे. गृहमंत्र्यांना रोहिंग्या मुस्लिमांना स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावर केंद्राची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली आहे, असेही सिसोदिया म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.