Assam : आसामला पुराचा वेढा कायम;पावसाची तीव्रता कमी झाल्याने पाणी ओसरु लागले

आसाममधील अनेक जिल्ह्यातील पुराचे पाणी गुरुवारी ओसरू लागले असले तरी पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Assam
Assam sakal
Updated on

गुवाहाटी : आसाममधील अनेक जिल्ह्यातील पुराचे पाणी गुरुवारी ओसरू लागले असले तरी पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जर पावसाची संततधार थांबली तर येथील परिस्थिती सुधारू शकते असेही प्रशासनाने सांगितले. गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आसाम आणि शेजारील अरुणाचल प्रदेश मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी आगामी काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २५ जिल्ह्यांतील सुमारे १४ लाख जणांना पुराचा फटका बसला असल्याची माहिती आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. यंदा पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलन यामुळे आतापर्यंत १०० जणांचे मृत्यू झाले असल्याची माहितीही देण्यात आली.

आसाममधील धुबरी जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून येथील सव्वादोन लाखाहून अधिक नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे काछर, दिब्रुगड, गोलाघाट आणि नागावसह अनेक जिल्ह्यातील रस्ते, पूल, आणि अन्य पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या दुथडीभरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.