नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपलं संकल्प पत्र जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये विविध योजनांसह काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसन योजनेचाही समावेश आहे. त्याचबरोबर कलम ३७० बाबतही महत्वाचं विधान अमित शहा यांनी केलं आहे.