BJP MP News: भाजपचे खासदार फुटणार?, सदस्यसंख्या होणार २३७, 'या' राज्यात खेला होबे

BJP MP News: खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. भाजपचे तीन खासदार टीएमसीच्या संपर्कात आहेत आणि लवकरच लोकसभेत भाजपचे संख्याबळ केवळ 237 खासदारांवर कमी होईल.
BJP MP will revolt in lok sabha
BJP MP will revolt in lok sabhaesakal
Updated on

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला मोठा फटका बसला. ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपला ३०० जागांचा आकडा देखील गाठता आला नाही. भाजपला संपूर्ण देशात २४० जागा मिळाल्या. भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. दरम्यान भाजपसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. भाजपचे तीन खासदार टिएमसीच्या संपर्कात असल्याचे गोखले यांनी सांगितले. लोकसभेत भाजपची संख्या कमी होईन २३७ होणार असल्याचा दावा खासदार साकेत गोखले यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजला २४० जागांवर विजय मिळाल. टिडीपी, जेडीयू सारख्या अनेक मित्रपक्ष्यांच्या मदतीने भाजप केंद्रात सरकार चालवत आहे. अशा स्थितीत भाजपच्या ३ जागा कमी झाल्या तर अवघड होईल.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ४२ पैकी २९ जागा जिंकल्या. तर भाजपच्या जागांची संख्या २०१९ मधील १८ वरून १२ वर आली आहे.

TMC राज्यसभा सदस्य गोखले सोशल मिडिया प्लटफॉर्म एक्सवर म्हणाले, "सध्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ २४० आहे आणि इंडिया आघाडीचे संख्याबळ २३७ आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे तीन खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच एक सुखद आश्चर्याचा धक्का बसणार आहे. त्यानंतर भाजपचे संख्याबळ २३७ पर्यंत कमी होईल तर भारत आघाडीच्या खासदारांची संख्या २४० पर्यंत वाढेल.

BJP MP will revolt in lok sabha
Lok Sabha Election 2024 : राज्यात 91 टक्के उमेदवारांची ‘अनामत’ जप्त; ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीसह सपचा समावेश

नरेंद्र मोदी यांची युती टिकणार नाही. हे फार काळ टिकणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकून बहुमताचा आकडा चुकवला, पण एनडीएने २९३ जागांसह बहुमताचा आकडा गाठला. काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या, तर 'इंडिया' आघाडीने २३४ जागा जिंकल्या. निवडणुकीनंतर, दोन विजयी अपक्ष उमेदवारांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे वचन दिले आणि विरोधी आघाडीचे संख्याबळ २३६ वर नेले.

 "२०१४ पासून तृणमूल काँग्रेस केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची शक्ती बनण्याचे स्वप्न पाहत आहे. पण त्याच्या आशा एकदा नव्हे तर तीनदा धुळीला मिळाल्या. भाजप आणि एनडीए एकत्र आहेत. बंगालमधील भाजपचा एकही खासदार तृणमूलच्या संपर्कात नाही," असे उत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले.

BJP MP will revolt in lok sabha
Lok Sabha Special Session: लोकसभेचं २४ जूनपासून विशेष अधिवेशन, लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.