Bridge Collapsed: उद्घाटनापूर्वीच ब्रिज कोसळला, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा दोष? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...

Bridge collapsed before the inauguration: बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच एक ब्रिज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkari
Updated on

पाटना- बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच एक ब्रिज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सध्या रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालय आहे. ब्रिजच्या पडण्यासाठी गडकरींच्या मंत्रालयाला दोषी ठरवण्यात येत होतं. याच प्रकरणी नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्री गडकरी म्हणाले की, 'बिहारच्या अरारियामध्ये जो ब्रिज कोसळला आहे तो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून निर्माण करण्यात आलेला नाही, तर हे काम बिहारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत सुरु होते.' 12 कोटी रुपये खर्च करून बनवलेला हा ब्रिज राज्य सरकार बनवत होते असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

Nitin Gadkari
Chenab Rail Bridge: जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर धावली ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला यशस्वी चाचणीचा VIDEO

ब्रिज कोसळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिज सुरुवातीला काही प्रमाणात कोसळला, त्यानंतर तो पूर्णपणे पाण्यामध्ये सामावला. ब्रिजच्या जवळ लहान मुले उभे असल्याचं दिसत आहेत. अनेकांनी हा क्षण कॅमेरामध्ये कैद केला आहे. ब्रिज उद्घाटनाआधीच कोसळला असल्याने हा एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

बिहारमध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. उद्घाटनाआधीच ब्रिज कोसळणे बिहारच्या लोकांसाठी नवीन नाही. ब्रिज किंवा इतर प्रकारचे निर्माण कार्य हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे त्याच शंकेला हवा मिळत आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्रालयाकडे देखील बोट दाखवलं जात होतं. त्यामुळेच गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असावं.

Nitin Gadkari
Bridge Collapsed : दौंडमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला;निकृष्ट बांधकामाच्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बिहारमध्ये निर्मानाधीन ब्रिज भागलपूर आणि खागरियाला जोडणार ब्रिज दोनदा कोसळला होता. पहिल्यांदा ब्रिज ३० एप्रिल २०२३ रोजी कोसळला होता, तर दुसऱ्यांदा तो ४ जून रोजी कोसळाला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रतिक्रिया द्यावी लागली होती. त्यांनी ब्रिज निर्माण करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं मान्य केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.