मोदी सरकारचे शेतकऱ्यांना दुसरे मोठे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या MSP वाढीला कॅबिनेटची मंजुरी

MSP on 14 Kharif season crops: केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ साठी १४ खरीफ पीकांची एमएमसी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
MSP on 14 Kharif season crops
MSP on 14 Kharif season cropsSakal
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. सत्तेत येताच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत दोनवेळा शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. नुकतेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ साठी १४ खरीफ पीकांची एमएमसी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मोदी सरकार-३ च्या कॅबिनेटने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ज्यारी, बाजरी, मक्का, कापूस, तांदुळ, नाचणी यांच्यासह १४ खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.' सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

MSP on 14 Kharif season crops
Shambhu Border : मोदी सरकारची 'MSP गॅरंटी' शेतकरी नेत्यांनी धुडकावली; म्हणाले, अभ्यासानंतर...

तांदळाची एमएससी ११७ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तांदळाला २३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. ही ५.३५ टक्क्यांची वाढ आहे, असं वैष्णव म्हणाले. कृषी खर्च आणि किमती आयोगाने (CACP) १४ पिकांची एमएसपी वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे.

MSP on 14 Kharif season crops
Viral Video: काय सांगता! अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर गेलेल्या पार्सलमध्ये आढळला जिवंत कोब्रा; पाहा धक्कादायक व्हिडिओ

सरकारकडे तांदळाचे अतिरिक्त उत्पादन असताना ही एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या काही राज्यांमध्ये पुढील काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मोदी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

वैष्णव म्हणाले की, २०१८ च्या केंद्राच्या नीतीमध्ये एमएसपीच्या दर हा उत्पादनाच्या १.५ टक्के असेल असं म्हणण्यात आलं होतं. त्याचे पालन केले जात आहे. उत्पादनाची मोजणी सीएसीपीच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीनेच करण्यात आली आहे. सध्या भारतीय अन्न मंडळाकडे जवळपास ५३.४ मिलियन टन तांदूळ पडून आहे. जो १ जुलैसाठीच्या आवश्यक बफरपेक्षा चार पटीने जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या खरेदीपेक्षा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा साठा पुरेसा आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सत्ता सांभाळताच पहिल्या दिवशी ९.२६ कोटी शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत १७ वा हफ्ता दिला होता. यासाठी २० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.