CBSE : दोनदा परीक्षेमुळे ‘सीबीएसई’ची सत्त्वपरीक्षा;नियोजन ठरेना,सेमिस्टर प्रणालीवर गांभीर्याने विचार सुरू

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नव्या शैक्षणिक अभ्यासक्रम धोरणानुसार वर्षातून दोनदा (जानेवारी- फेब्रुवारी, मार्च- एप्रिल आणि जून) परीक्षा घेण्याची शिफारस करण्यात आली असली तरीसुद्धा अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन करताना ‘सीबीएसई’चीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
CBSE
CBSE sakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नव्या शैक्षणिक अभ्यासक्रम धोरणानुसार वर्षातून दोनदा (जानेवारी- फेब्रुवारी, मार्च- एप्रिल आणि जून) परीक्षा घेण्याची शिफारस करण्यात आली असली तरीसुद्धा अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन करताना ‘सीबीएसई’चीच कोंडी होण्याची शक्यता आहे. वेळेचे गणित जुळत नसल्याने बोर्डही आता चिंतेत पडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘सीबीएसई’कडून अर्धवार्षिक सेमिस्टर प्रणालीच्या पर्यायावर गांभीर्याने विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येतात. वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यासाठी विविध घटकांसोबत चर्चा केली जात असून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत पण याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा नेमकी कशी? आणि कधी घ्यायची? याबाबत ‘सीबीएसई’चे अधिकारी कमालीचे संभ्रमात आहेत. सेमिस्टर प्रणालीनुसार परीक्षा घेण्यासाठी सीबीएसईकडून तीन पर्यायांवर गांभीर्याने चर्चा केली जात आहे. यात पहिली परीक्षा ही जानेवारी- फेब्रुवारीमध्ये, दुसरी मार्च- एप्रिलमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. जूनमध्ये दुसरी परीक्षा घेण्याबरोबरच त्याला पूरक परीक्षा अथवा चाचणी घेतली जावी का? हा पर्याय देखील पडताळून पाहिला जात आहे.

दोनदा परीक्षा घेण्यासाठी बोर्डालाही मोठी तयारी करावी लागेल. या तयारीसाठी साधारणपणे ५५ दिवसांचा कालावधी लागतो. ‘सीबीएसई’समोरच ही परीक्षा नेमकी कशापद्धतीने घ्यायची असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

दीडशे उपाययोजना आवश्यक

सीबीएसई बोर्डाच्या शाळांचा देशात आणि देशाबाहेर देखील विस्तार आहे त्यामुळे येथे सेमिस्टर पद्धत लागू करणे फारसे व्यावहारिक ठरणार नाही. याशिवाय अन्य स्पर्धा परीक्षा आणि भौगोलिक आव्हानांचा देखील गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे ‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विद्यमान प्रणालीमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी किमान दीडशे उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ‘सीबीएसई’कडून शिक्षण मंत्रालयास सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com