Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांच्या ताज्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.
Mani Shankar Aiyar
Mani Shankar Aiyar
Updated on

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांच्या ताज्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले असून भाजपने यावरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तवावरुन स्वत:ला वेगळं केलं आहे.

१९६२ च्या इंडो-चायना युद्धामध्ये चीनने 'कथितरीत्या' भारताचा भाग बळकावला, असं अय्यर म्हणाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ('Nehru's First Recruits') एका पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यासंदर्भातील एक व्हिडिओ भाजपकडून व्हायरल केला जात असून याला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे.

Mani Shankar Aiyar
Karnataka Government : 'PM मोदींच्या हॉटेलमधील मुक्कामाचे 80 लाखांचे बिल काँग्रेस सरकार भरणार'; काय आहे कारण?

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मणिशंकर अय्यर यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. 'त्यांनी चुकून तो शब्द वापरला. जास्त वयामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली. पण, काँग्रेस पक्षाचा त्यांचा मूळ वक्तव्याशी कोणताही संबंध नाही;, असं जयराम रमेश म्हणालेत.

वादाला सुरुवात झाल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली आहे. चीनच्या आक्रमणासंबंधात मी चुकीने 'कथित' या शब्दाचा वापर केला. त्याबाबत मी प्राजंळपणे माफी मागतो, असं ते म्हणाले. त्यांच्या माफीनंतर देखील भाजपच्या नेत्यांचे समाधान झालेले दिसत नाही. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.

Mani Shankar Aiyar
PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

अय्यर यांचे वक्तव्य राजकारणाला भरकटवण्याचा प्रयत्न आहे. नेहरुंनी संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी सदस्यत्वाचा दावा चीनला देऊन टाकला. राहुल गांधींनी पाकिस्तानसोबत गुप्त करार केला आहे. त्यांच्या संस्थेला चीनकडून निधी मिळतो. काँग्रेसने चिनी वस्तूंना मुक्तद्वार दिले. आता काँग्रेस नेते अय्यर चीनच्या आक्रमणालाच नाकारू पाहात आहेत. चीनने भारताचा ३८००० स्क्वेअर किमी भूभाग बळकावला आहे हे सत्य आहे, असं मालविया म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.