Yogi Adityanath : अतिआत्मविश्वास नडला! उत्तर प्रदेशातल्या पराभवाला जबाबदार कोण? पक्ष की सरकार? योगी आदित्यनाथ म्हणाले...

BJP Uttar Pradesh : उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. कोणतीच व्यक्ती किंवा कोणतंच सरकार संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही. मोठ्या वृक्षाच्या लाकडापासून जेव्हा कुऱ्हाड बनते तेव्हा ते झाड तोडलं जाऊ शकतं.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on

Uttar Pradesh Loksabha results : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून पराभवाची समीक्षा केली जात आहे. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची एक बैठक रविवारी लखनऊमध्ये पार पडली.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीती पराभवावर चर्चा झाली तर भविष्यातील रोडमॅप निश्चित केला गेला.

बैठकीमध्ये काही गोष्टी अशा घडल्या, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाला नेमकं जबाबदार कोण? पक्षसंघटना की राज्य सरकार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच पक्ष आणि सरकारमधील समन्वयावरुन काही नेते बोलले.

Yogi Adityanath
Hingoli Yellow Rain: आश्चर्य! हिंगोलीत पडला पिवळा पाऊस; भलत्याच चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. कोणतीच व्यक्ती किंवा कोणतंच सरकार संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही. मोठ्या वृक्षाच्या लाकडापासून जेव्हा कुऱ्हाड बनते तेव्हा ते झाड तोडलं जाऊ शकतं.

मौर्य यांनी कार्यकर्त्यांसमोर येणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला. म्हणाले की, ज्या तुमच्या वेदना आहेत, त्याच आमच्याही वेदना आहेत. त्यांच्या या विधानाने टाळ्या मिळाल्या परंतु अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले.

मुख्यमंत्री योगींनी आपल्या संबोधनात दोन मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात झालेला आपला पराभव हा अतिआत्मविश्वासाचा पराभव आहे. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर केला, त्याला आपण काऊंटर करु शकलो नाहीत.

Yogi Adityanath
JioTag Air: आता आपली कोणतीही आवडती वस्तू करता येणार ट्रॅक; जीओने बाजारात आणलंय स्वस्त ट्रॅकर डिव्हाईस

यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथांनी नेते आणि कार्यकर्त्यांना टास्क देऊन पोटनिवडणुकीमध्ये ताकद दाखवून देण्याचं आवाहन केलं. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी साध्या कार्यकर्त्यांचं हे काम नाही.. आपल्याला चॅलेंज घेणारे लोक हवे आहेत, असं म्हटलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com