नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. दारु धोरण घोटाळ्याच्या आरोपांमध्ये ते चार महिने तुरुंगात होते. सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर शनिवारी ते तुरुंगातून बाहेर आले. त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.