चंडीगड : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह हरियानात हवेतील प्रदूषणास हातभार लावणाऱ्या काडीकचरा जाळण्याच्या घटनांना चाप बसविण्यासाठी हरियाना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत कैथल जिल्ह्यात शेतात काडीकचरा जाळणाऱ्या चौदा शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.