Crime: 'माझ्या मुलीला संपव', महिलेने प्रियकराला दिली सुपारी, योजना समजताच तरुणीनं मारेकऱ्यालाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर आईलाच मारलं

Uttar Pradesh Crime: एका विवाहितेने तिच्या प्रियकराला मुलीच्या हत्येची सुपारी दिली. प्रियकरही तिच्या मुलीचा खून करायला गेला होता. पण मुलीने त्याला अशी गोष्ट सांगितली की, प्रियकराचा विचार बदलला. त्यानंतर त्याने मुलीऐवजी आईची हत्या केली.
Murder
MurderESakal
Updated on

उत्तर प्रदेशातून हत्येची भीषण घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने प्रियकराला तिच्या मुलीला मारण्याची सुपारी दिली. प्रियकरही खून करायला गेला होता, पण मुलीने त्याला अशी ऑफर दिली. ज्यामुळे संपूर्ण प्रकरण पालटलं गेलं. त्यानंतर प्रियकराने विचार बदलून मुलीऐवजी महिलेची हत्या केली.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एटा येथील नयागाव येथील अल्हापूर गावात ही घटना घडली आहे. अलका नावाची ३२ वर्षीय महिला पती रमाकांत आणि दोन अल्पवयीन मुलींसोबत येथे राहत होती. तिच्या मोठ्या मुलीचे दोन मुलांसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून महिला आणि मुलीमध्ये वाद निर्माण झाला होता. महिलेने सांगितले की, दोन्ही मुले चांगली नाहीत, म्हणून तिने आपल्या मुलीला त्या मुलांपासून दूर राहण्यास सांगितले, परंतु मुलीने तिचे ऐकले नाही.

मुलीच्या या कृत्याला कंटाळून अलकाने दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर दोघांनाही सोडून दिले. मात्र त्यानंतरही मुलीने आपली सवय सोडली नाही आणि दोन्ही मुलांशी बोलणे सुरू केले. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी अलकाचा मृतदेह जसरथपूर परिसरात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या हत्येचा तपास केला असता दोन्ही मुलांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. त्यावर पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचे रेकॉर्ड काढले.

Murder
Wall Collapse in Gujarat : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना! जमीन खचल्याने ७ मजुरांचा मृत्यू; ४ ते ५ जण अजूनही अडकल्याची भीती

त्यात अलकाचे तिच्या माहेरी राहणाऱ्या सुभाष याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही एकमेकांशी तासनतास बोलत असत. बलात्कार प्रकरणात सुभाष 10 वर्षे तुरुंगात होता आणि 7 महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हापासून तो सतत अलकाच्या संपर्कात होता. त्यानंतर पोलिसांनी सुभाषचा शोध सुरू केला. तो फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांना अलकाची मोठी मुलगीही घरातून फरार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपास पथकाने 10 ऑक्टोबर रोजी छापा टाकून सुभाष आणि मृताच्या मुलीला अटक केली.

यानंतर आरोपी सुभाषने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला. या महिलेचे लग्नानंतरही प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी अलकाने तिला सांगितले की तिच्या मोठ्या मुलीचे दोन मुलांसोबत अफेअर होते. ज्यामुळे ती खूप काळजीत होती. मुलीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती मान्य झाली नाही. त्यानंतर अलकाने सुभाषला आपल्या मुलीला मारण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली.

सुभाषने सांगितले की, तो अलकाच्या मुलीकडे गेला आणि तिला सर्व प्रकार सांगितला. यावर ती मुलगी रडायला लागली, त्यामुळे तिची दया आली. त्याने मुलीला मारले नाही आणि तिला परत आग्रा येथे आणले. त्याने अलकाकडे सुपारीचे पैसे मागितले असता ती नाराज झाली. यावर आरोपीने महिलेला आपली मुलगी जिवंत असल्याचे सत्य सांगितले. त्यानंतर महिलेने सुभाषला सांगितले की, जेव्हा तो तिच्या मुलीला तिच्यासमोर मारेल तेव्हा पैसे देईल. यावर आरोपीने आईबद्दल सर्व काही मुलीला सांगितले. यावर मुलीने आरोपी सुभाषला लग्नाची ऑफर दिली आणि सांगितले की जर त्याने तिच्या आईला मारले तर ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर सुभाषने अलकाला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर महिलेला मारहाण करून जखमी केले आणि ओढणीने तिचा गळा दाबून खून केला, असं त्याने तपासात सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.