Hathras Case: SITच्या अहवालात भोले बाबाला क्लीन चिट? आयोजन समिती अन् प्रशासनावर उपस्थित केले प्रश्न

Hathras Case: हाथरस दुर्घटनेची मूळ कारणे आणि निष्काळजीपणा उघड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. एसआयटीच्या या अहवालात 119 लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
Hathras Case
Hathras CaseEsakal
Updated on

हाथरस दुर्घटनेची मूळ कारणे आणि निष्काळजीपणा उघड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या या अहवालात 119 लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तपास पथकात एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ आणि अलिगडचे आयुक्त चैत्रा व्ही यांचा देखील समावेश करण्यात आला होता.

विशेष तपास पथकाने (एसआयटी) हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत 300 पानांचा तपास अहवाल सादर केला आहे. 2 जुलै रोजी साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा याच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाचे आयोजन करणाऱ्या समितीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे एसआयटीने आपल्या अहवालात लिहिले आहे. याशिवाय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, अहवालात भोले बाबाचा उल्लेख नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या या अहवालात 119 लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तपास पथकात एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ आणि अलिगडचे आयुक्त चैत्रा व्ही यांचा समावेश करण्यात आलेला होता.

Hathras Case
Hathras Stampede: 'त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले अन् गुदमरून मृत्यूमुखी पडले...', भोले बाबाच्या वकिलाचा नवा दावा

हाथरस चेंगराचेंगरी घटनेप्रकरणी एसआयटीने 119 जणांचे नोंदवले जबाब

एसआयटीने 300 पानांचा अहवाल तयार करण्यासाठी आणि चेंगराचेंगरीच्या ठिकाणी काय घडलं हे जाणून घेण्यासाठी 119 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. जबाब नोंदवणाऱ्यांमध्ये यूपी पोलिसांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारीही होते. ज्यामध्ये हाथरसचे डीएम आशिष कुमार आणि एसपी निपुण अग्रवाल यांचीही नावे होती. सत्संगाला 2 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते, तर अधिकाऱ्यांनी सुमारे 80,000 लोकांसाठी परवानगी मागितली होती. अशा स्थितीत प्रशासन आणि आयोजन समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अहवालात चेंगराचेंगरीचे मुख्य कारण असल्याचे काही वृत्तसंस्थांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

Hathras Case
Hathras Stampede: हाथरस प्रकरणातील मोठी बातमी! मुख्यमंत्री योगींकडे सोपवला 15 पानी SIT अहवाल, काय आहे त्यामध्ये?

चेंगराचेंगरीच्या दिवशी 2 जुलै रोजी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. एसआयटीच्या अहवालात पीडितांच्या कुटुंबीयांच्या जबाबांचाही समावेश आहे. यापूर्वी, उत्तर प्रदेश न्यायिक आयोगाच्या पथकाने हातरस चेंगराचेंगरी प्रकरणात अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले होते.

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी 6 जुलै रोजी भोले बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी बाबानी एका संदेशात हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे दुःखी असल्याचे सांगितले होते आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यास सांगितले होते.

Hathras Case
Hathras Stampede: हाथरस दुर्घटना! 'तो' शेवटचा कॉल अन् बाबाचा मोबाईल झाला बंद; वाचा इनसाईड स्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.