Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Heavy Rains In Chennai : तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून पावसाने झोडपले असल्याने या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे.
Chennai Rain
Chennai Rain
Updated on

चेन्नई, ता.१५ ः तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून पावसाने झोडपले असल्याने या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर चेन्नईसह अन्य काही जिल्ह्यांतील शाळा महाविद्यालयांना मंगळवारी सुटी देण्यात आली होती.

त्याचप्रमाणे बुधवारी परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा महाविद्यालयांना सुटी द्यावी की नाही, याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिले आहेत. शाळा महाविद्यालयांप्रमाणेच येथील सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कार्यालयांना देखील सुटी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे खासगी कंपन्यांनी देखील सुटी द्यावी किंवा अगदी आवश्‍यक असलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी खासगी कंपन्यांना केले आहे.

राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर स्टॅलिन यांनी मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील परिस्थितीचा आणि बचाव कार्याच्या तयारीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे नदीपात्रांलगतच्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे या भागात पाणी साचल्यास पाण्याचा उपसा करण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये मोटारपंपही बसविण्यात आले आहेत.


परीक्षा, मुलाखती आणि कार्यक्रम रद्द

राज्यातील अनेक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध विद्यापीठांनी बुधवारी आणि गुरुवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयांमध्ये होणारे विविध कार्यक्रम आणि मुलाखतीही रद्द करण्यात आल्या आहेत.\

जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर येथील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी येथील दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत आहे. मागणी वाढली असल्याने भाजीपाल्याच्या दरांतही वाढ झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार टोमॅटो १२० रुपये किलो तर कांदा ८० रुपये किलो झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा असल्याचेही येथील दुकानदारांचे म्हणणे आहे.


१६,००० स्वयंसेवक बचावकार्यासाठी तैनात

३०० मदत छावण्यांची निर्मिती

या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू

७ विमानांचे उड्डाण रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.