नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडणार आहे. आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत हे मतदान होईल. शेवटच्या टप्प्यातले मतदान पार पडल्यानंतर येत्या मंगळवारी (ता. ४) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ९०४ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होईल. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात मोदी यांचा मुकाबला कॉँग्रेसच्या अजय राय यांच्याशी होत आहे. शनिवारी होणाऱ्या या मतदानाबरोबरच १९ एप्रिलच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेली रणधुमाळी थंडावणार आहे.
साऱ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक करणार की दहा वर्षांच्या वनवासानंतर काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार सत्तेत येण्याचे स्वप्न साकार होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’ला चारशेच्या वर जागा मिळतील, असा दावा भाजपने केला आहे, तर ‘इंडिया’ आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वास या आघाडीतील घटक पक्षांनी व्यक्त केला आहे.
प्रमुख उमेदवार
नरेंद्र मोदी, कंगना राणावत, रवी किशन, अनुराग ठाकूर, रवीशंकर प्रसाद, निशिकांत दुबे, तरणजित सिंह संधू, सीता सोरेन (सर्व भाजप), अभिषेक बॅनर्जी, सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल कॉँग्रेस), अनुप्रिया पटेल (अपना दल), मनीष तिवारी, चरणजीत सिंह चन्नी, आनंद शर्मा (सर्व काँग्रेस) मिसा भारती (राजद), हरसिमरत कौर बादल (अकाली दल)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.