मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एका हिंदू मुलीने तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न केले. त्यानंतर ती मुंबईला गेली. दीड वर्षापूर्वी ही मुलगी एका मुस्लिम पुरुषासोबत पळून गेली होती, ज्यामुळे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तिला शोधून काढले आणि तिला नाहरगढ पोलिस ठाण्यात जबाब देण्यास सांगितले. तिने कबूल केले की तिने तिच्या धर्माबाहेर लग्न करण्यासाठी घर सोडले होते. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचेही तिने नमूद केले आहे. मुलीने तिच्या आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. (MP News)
यानंतर तिने आपल्या वकिलासोबत नरगढ पोलीस स्टेशन गाठले आणि लग्नाची कागदपत्रे दाखवली. यानंतर तिच्या वडिलांना बोलावण्यात आले. मात्र संतापलेल्या वडिलांनी तिच्या अंगावर कफन व हार टाकला आणि नातं नेहमीसाठी संपवलं. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
"माझी मुलगी कॉलेजला जायची. दीड वर्षापूर्वी ती कॉलेजला जात असताना बसस्थानकावरून बेपत्ता झाली होती. तिचे अपहरण झाले होते की कोणासोबत पळून गेले होते याबाबत काहीही माहिती नाही. दीड वर्षानंतर ती वकिलासोबत पोलिस ठाण्यात आली आणि कागदपत्रे दाखवली. त्यांचा हा निर्णय मला मान्य नाही ना समाजाला. माझ्या मुलीला मृत मानून मी कफन घालून निरोप घेतला आहे," असे मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे. (latest marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.