Devendra Fadnavis: भाजपच्या कोअर पॅनलची आज बैठक; फडणवीसांचा राजीनामा स्विकारणार का?; जाणून घ्या कारणं

लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्य सरकारमधून पदमुक्त करावं अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं अशी मागणी करत राजीनामा दिला होता. तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. (Maharashtra BJP core panel meeting today at Delhi Fadnavis resignation may accepted need to know reasons)

केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं. सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत, असं टाइम्स नाऊच्या वृत्तात म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Nana Patole: ''स्वत:ला संत समजू नका''; नाना पटोलेंचे कार्यकर्त्याने धुतले पाय; पाहा व्हिडिओ

आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं. तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.

Devendra Fadnavis
Viral Video : ‘तिच्या लग्नाआधीच इकडे आलो, रिक्षावर ‘AS’ लिहिलं आणि...’ व्हायरल व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल

राजीनामा स्विकारला जाण्याची शक्यता

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.

  1. यापार्श्वभूमीवर या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही, किंवा या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.

  2. उलट जर फडणवीसांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावरुन मुक्त केलं तर त्यांना पक्षासाठी पूर्णवेळ काम करता येईल. त्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो.

  3. त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये खांदेपालट झालं तर त्यामुळं नव्या लोकांना संधी दिल्याचा फायदाही कदाचित पक्षाला होऊ शकतो.

  4. त्याचबरोबर ज्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं भाजपला मोठं नुकसान झालं असं सांगितलं जात आहे. त्याअनुषंगानं भाजपनं लोकसभेला गमावलेल्या जागांवर विशेष काम करता येऊ शकतं.

    या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास फडणवीसांच्या राजीनामा स्विकारला जाण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.