मणिपूर पुन्हा पेटलं! चार जणांचा मृत्यू, पाच जिल्ह्यात कर्फ्यु, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manipur burning नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर पुन्हा पेटलं आहे. मणिपूरच्या लेंगोल पहाडी भागात गोळ्या घालून चौघांची हत्या करण्यात आली आहे, ११ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Manipur burning
Manipur burning
Updated on

नवी दिल्ली- नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर पुन्हा पेटलं आहे. मणिपूरच्या लेंगोल पहाडी भागात गोळ्या घालून चौघांची हत्या करण्यात आली आहे, ११ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जबरदस्तीने वसुली करण्यासाठी हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ भागात आले होते पण तेंव्हा स्थानिकांनी त्यांना तिथून हाकलून बाहेर काढलं. त्यावेळी तिथून जाताना हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यात चौघांचा मृत्यू झालाय.

स्थानिक नागरिकांनी काही गाड्यांना आग लागल्यामुळे वातावरण तापलं होतं. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपुर जिल्ह्यात सरकारने कर्फ्यु लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. (Manipur burning Four people died curfew in five districts emergency meeting called by Chief Minister )

Manipur burning
Bharat Nyay Yatra: आता 'भारत न्याय यात्रा'! मणिपूर ते मुंबई सुरु होणार राहुल गांधींचा झंझावात; 'या' राज्यांमधून करणार प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता,तर अकरा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. त्यांनी काही वाहनांना आग लावून टाकली.

कर्फ्यु

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताज्या हिंसेमुळे थौबल, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि बिष्णूपूर जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. एका व्हिडिओ संदेशात मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणालेत की, मी या हिंसेचा निषेध करतो. लिलोंगच्या लोकांनी शांतता ठेवावी असं मी आवाहन करतो. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस काम करत आहेत. आरोपींना कायद्यानुसार शिक्षा देण्यात येईल.

Manipur burning
Manipur Violence : प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल केल्यास कारवाई; मणिपूर सरकारचा निर्णय

आतापर्यंत १८० जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये हिंसा थांबण्याचं नाव घेत नाही. या हिंसेमध्ये आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मैतेई आणि कुकी समाजात हा संघर्ष सुरु आहे. मैतेई समूदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यात ५३ टक्के मैतेई लोक राहतात, तर आदिवासी-नागा आणि कुकी समाज ४० टक्क्यांच्या जवळ आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.