Lok Sabha Election: प्राण जाई पर बचन न जाई... लोकसभेतल्या अपयशामुळे मंत्र्याने दिला राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Lok Sabha Election: राजस्थानमधील भजनलाल सरकारमधील मंत्री किरोडी लाल मीणा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. सध्या त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. सरकार पुन्हा एकदा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू शकते.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

राजस्थानमधील भजनलाल सरकारमधील मंत्री किरोडी लाल मीणा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. सध्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. अशा स्थितीत सरकार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू शकते. बातम्यांनुसार, किरोडी लाल मीना यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दौसा लोकसभा मतदारसंघातून भाजपचा पराभव झाल्यास राजीनामा देईन, असे सांगितले होते.

Lok Sabha Election
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई! 20 जणांना अटक, मुख्य सेवेकऱ्यांचा शोध सुरू

किरोडी लाल मीना यांनी केलं ट्विट

राजीनाम्याच्या बातम्यांदरम्यान किरोडी लाल मीणा यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. ज्यामध्ये मीना यांनी लिहिले आहे की, 'रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाई पर बचन न जाई', ज्याचा संबंध लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या विधानांशी जोडला जात आहे.

गेल्या काही दिवसांत किरोडी लाल मीणा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. 14 मे रोजीच्या पहिल्या पत्रात मीना यांनी शहरातील गांधीनगर भागातील एका बहुमजली निवासी प्रकल्पात सरकारी तिजोरीचे 1,146 कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान निदर्शनास आणले होते. अशी पत्रे दिल्यामुळे किरोडीलाल मीणा यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात आघाडी उघडली असल्याची चर्चा होती.

Lok Sabha Election
NEET Exam: नीट परीक्षेत लातूरमध्ये दहा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिले, इतर परीक्षांचाही होणार तपास; CBIचे अधिकारी ठाण मांडून

‘या सातपैकी एकही जागा गमावली तर मी राजीनामा देईन’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला ७ जागांची जबाबदारी दिली होती, असे किरोरी लाल मीना यांनी दौसा येथील पंतप्रधान मोदींच्या सभेत सांगितले होते. या वेळी या सातपैकी एकही जागा गमावल्यास मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देईन. या सातपैकी एक अतिशय महत्त्वाची जागा जिथे किरोडीलाल मीना यांची मजबूत पकड मानली जाते ती म्हणजे दौसा. जिथून काँग्रेसच्या मुरारीलाल मीना यांनी मोठा विजय मिळवला आहे.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांनी राजीनामा न दिल्याबद्दल काँग्रेसनेही अनेकदा भाष्य केले होते. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे.

Lok Sabha Election
Bridge Collapse in Bihar: बिहारमध्ये पूल पडण्याच्या घटना का वाढल्या? सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, चौकशीची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com