दुकानात चहा थोडासा थंड असला तरी लोक कानाखाली मारायचे, लहानपणी खूप अपमान सहन केला- PM मोदी

PM Modi said about his childhood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडो सभा घेतल्या आहेत.
PM Modi
PM Modi
Updated on

नवी दिल्ली- राजकारणात आल्यापासून नाही तर लहानपणापासूनच मला अपमानाचे आयुष्य जगावे लागले आहे. त्यामुळे माझ्यात खूप सहनशीलता आली आहे. लहानपणी मी कप-प्लेट धुवायचो. आमचं छोटंसं दुकान होतं, तिथे येणारा कोणीही माझ्यावर भडकायचा. दुकानात चहा थोडासा जरी थंड असला तरी लोक मला कानाखाली मारायचे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'आम्ही कामदार आहोत, तर ते नामदार आहेत. आम्ही काम करतो. त्यामुळे आम्हाला शिव्या-शाप आणि अपमान सहन करावा लागतो. पण, मला आता याची सवय झाली आहे. कारण, लहानपणापासून मी अशा गोष्टींना सामोरे जात आहे.'

PM Modi
PM Modi : ‘व्होट जिहादीं’ ना आरक्षण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ममतांवर टीका

ईडी-सीबीआयवर भाष्य

ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात ईडीने ३४ लाख जप्त केले होते, पण, २०१४ ते २०२४ च्या काळात ईडीने २२०० कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकांनी नोटांचा ढिगारा पाहिला आहे. इतके पैसे आहेत की ते घेऊन जायला अनेक टेम्पो लागतील. अशा लोकांना सोडलं जाणार नाही. मोठे लोक तुरुंगात गेले आहेत. ज्यांनी पाप केलं आहे, त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडो सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं दिसत आहे. कारण, त्यांनी यासंदर्भात तयारी देखील केली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर काय करायचं याचा प्लॅन देखील मोदींकडे तयार आहे.

PM Modi
Raghuram Rajan: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचं काय होणार? रघुराम राजन म्हणाले...

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरु आहे. सध्या सहा टप्प्यातीत मतदान पार पडले आहे. सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होईल. या दिवशी देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल. तूर्तास, भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीने मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत अशी भविष्यवाणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.