Latest Marathi News: ‘‘भारतीय राजकारणातून प्रेम, आदर आणि मानवता यांचा लोप झाला आहे. चांगली कौशल्ये असलेल्या लोकांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.
राहुल गांधी यांनी आज डल्लास येथील टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांना सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. चीन मात्र या समस्येपासून दूर असून जागतिक उत्पादनात ते आघाडीवर आहेत. भारत आणि पाश्चिमात्य देशांनी उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यानेच असे झाले आहे. त्यामुळे भारतात उत्पादनावर भर देणे आवश्यक आहे. यामुळे नोकऱ्यांची निर्मिती होईल.