Ratan Tata: स्वातंत्र्यलढ्यात रतन टाटांनी इंग्रजांना हैराण केलं होतं; ब्रिटिश गाड्यांच्या इंजिनात साखर टाकायचे अन्...

Tata Trust: रतन टाटा यांचं घर मुंबईत आझाद मैदानाच्या जवळच होते. त्यांच्या घराच्या बालकनीतून आझाद मैदानातल्या हालचाली दिसायच्या. तेव्हा तिथे सातत्याने स्वातंत्र्यसैनिक उपस्थित असायचे. नेते यायचे, भाषणं द्यायचे आणि कधी कधी इंग्रज शिपायांसोबत तूतू-मैंमैं व्हायचं. त्यांनी अनेकदा आझाद मैदानामध्ये लाठीचार्ज, दंगे आणि हिंसा झालेली बघितली होती.
Ratan Tata
Ratan Tata
Updated on

Ratan tata life story: रतन टाटा यांचं बुधवारी वृद्धापकाळाने निधन झालं. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातला एक ज्येष्ठ उद्योगपती आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व हरवल्याने प्रत्येक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील दिग्गजांनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली.

देशामध्ये नव्या भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न बघितलं जात होतं, तेव्हा रतन टाटांचा जन्म झाला. १९३७ मध्ये जन्मलेल्या रतन टाटांनी बालपणी आपल्या परीने इंग्रजांना शक्य तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दलचा किस्सा स्वतः रतन टाटा यांनीच सांगितला होता.

करण थापर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी सांगितलं की, मी लहान होतो. परंतु भारताला गुलामीत बघून चीड येत होती. त्यामुळे आतल्या आत बेचैन होत होतो. मला भारताला स्वातंत्र्यात बघायचं होतं.

रतन टाटा यांचं घर मुंबईत आझाद मैदानाच्या जवळच होते. त्यांच्या घराच्या बालकनीतून आझाद मैदानातल्या हालचाली दिसायच्या. तेव्हा तिथे सातत्याने स्वातंत्र्यसैनिक उपस्थित असायचे. नेते यायचे, भाषणं द्यायचे आणि कधी कधी इंग्रज शिपायांसोबत तूतू-मैंमैं व्हायचं. त्यांनी अनेकदा आझाद मैदानामध्ये लाठीचार्ज, दंगे आणि हिंसा झालेली बघितली होती.

Ratan Tata
विधानसभा निवडणुकीत कोकणातील 15 जागा महायुती जिंकणार; 'मविआ'वर निशाणा साधत उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

रतन टाटा म्हणाले होते की, मी माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन इंग्रजांच्या गाड्यांच्या इंधन टाकीमध्ये साखर टाकायचो. इंग्रजांविरुद्धचा रोष त्या माध्यमातून व्यक्त व्हायचा. इंग्रज भारतातून पळून जावेत यासाठी त्यांच्या बालमनाने केलेला तो एक प्रयत्न होता. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ब्रिटिशांची कार किंवा मोटारसायकलमध्ये साखर टाकायचो.

गाड्यांच्या इंधन टाकीत साखर टाकल्यामुळे मशीन बिघडत असे. साखरेमुळे इंधन फिल्टर बंद होतं आणि त्यामुळे इंजिनच जागच्या जागी थांबतं. साखरेतले क्रिस्टल एअर फिल्टरला जाम करु शकतात, त्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि इंजिन बिघडतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.