Akhilesh Yadav : ‘मूळ प्रश्‍नांपासून लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न’

बेकायदा धर्मांतर कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मांडलेल्या विधेयकावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavsakal
Updated on

नवी दिल्ली : बेकायदा धर्मांतर कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मांडलेल्या विधेयकावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली. जातीय राजकारणाचा वापर करत मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष भरकटविण्याचा हा प्रयत्न असल्याचे यादव यांनी म्हटले.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत धर्मांतरविरोधी कायद्यातील दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. याबाबत पत्रकारांनी अखिलेश यादव यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले,‘‘भाजपला यापेक्षा वेगळे काही करता येत नाही. ते काहीही नवे करत नाहीत. जातीय राजकारणाचा वापर करत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.’’

यादव म्हणाले,‘‘केंद्र बक्सार ते भागलपूर द्रुतगती महामार्ग बांधत आहे. यात भर टाकून आणखी २५ किलोमीटरचा रस्ता बांधल्यास दिल्लीहून भागलपूरला जाता येईल. मात्र, आमची या मागणीवर विचार करण्यास सरकारला वेळ नाही. त्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडणे लावून द्यायची आहेत. कावड यात्रेबाबत केलेल्या नियमांमधून हेच दिसून आले आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.