Mallikarjun Kharge : संसदेतील पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे संसद परिसरातील पुतळे हटविल्याबद्दल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sakal
Updated on

नवी दिल्ली - महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे संसद परिसरातील पुतळे हटविल्याबद्दल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे पुतळे सन्मानाने त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारने संसद परिसरातील पुतळे एका ठिकाणी ‘प्रेरणास्थळ’ म्हणून एकत्रित केले आहेत. यात संसद इमारतीच्या दर्शनी भागात असलेला महात्मा गांधी यांचा ध्यानस्थ मुद्रेतील प्रसिद्ध पुतळाही हटविण्यात आला आहे. यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची सहमती सुद्धा घेण्यात आलेली नव्हती. केंद्र सरकारने हा एकतर्फी निर्णय घेतलेला आहे.

विरोधी पक्षांचे सदस्य केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी किंवा विरोध दर्शविण्यासाठी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येत होते. हा पुतळा हटविल्याने विरोधकांना आपला निषेध व्यक्त करण्याचा मार्ग सुद्धा मोदी सरकारने बंद केल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. या प्रकारे एकतर्फी निर्णय घेणे हे हुकूमशाही प्रवृत्तीचे द्योतक असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com