नवी दिल्लीः विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या बोर्ड परीक्षा घेणाऱ्या कर्नाटक सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढताना राज्य सरकारला इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचा निकाल पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करण्यास मज्जाव केला आहे. न्या. बेला. एम त्रिवेदी आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. एखाद्या जिल्ह्यामध्ये परीक्षा घेण्यात आली नसेल तर ती आता घेऊ नये असे न्यायालयाने आदेशांत म्हटले आहे.