Team India Meets PM Modi: बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? PM मोदींच्या प्रश्नावर रोहितनं काय दिलं उत्तर?

टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Narendra Modi_Rohit Sharma
Narendra Modi_Rohit Sharma

नवी दिल्ली : T20 क्रिकेटच्या विश्वचषकाची फायनल जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या स्टेडियममधील एका कृतीची मोठी चर्चा झाली होती. रोहितनं मैदानातील मातीचं चुंबन घेतलं होतं. त्याच्या या कृतीमुळं विविध चर्चांना उधाणही आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या याच कृतीवरुन आजच्या भेटीत त्याला सवाल केला. त्या मातीची चव कशी होती? असा सवाल मोदींनी रोहित शर्माला केला त्याचं उत्तरही त्यानं दिलं आहे. (Team India Meets PM Modi how did Barbados stadium soil taste Modi question to Rohit Sharma)

Narendra Modi_Rohit Sharma
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी 'बेस्ट'ची बस का नाही? गुजरातची बसच का? रोहित पवारांचा सवाल

वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथून टीम इंडिया विश्वचषकासह भारतात दाखल झाली. टीमनं सकाळी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गुरुवारी भेट दिली. यावेळी मोदींनी सर्व खेळाडूंशी वैयक्तिकरित्या संवाद साधला. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओजचही सकाळपासून व्हायरल झाले आहेत. तासभर झालेल्या या भेटीत टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Narendra Modi_Rohit Sharma
Wankhede Stadium: टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम परिसरात तुफान गर्दी; चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीमुळं गोंधळ

यावेळी मोदी रोहित शर्माला म्हणाले, फायनल जिंकल्यानंतर टर्फवरची माती तू चाखून पाहिलीस त्या मातीची चव नेमकी कशी होती? त्याचबरोबर कोहलीला देखील मोदींनी विचारलं की वर्ल्डकपच्या संपूर्ण सेरिजमध्ये तुझ्या धावा झाल्या नाहीत पण शेवटी फायनलमध्ये तू धावा केल्यास पण वर्ल्डकपमध्ये मोठ्या खेळीसाठी तू काय विचार करत होतास? तसंच अक्षऱ पटेलला मोदी म्हणाले की, अंतिम फेरीत टीम अडचणीत आल्यानंतर संघात पदोन्नती मिळाल्यानंतर कसं वाटलं?

Narendra Modi_Rohit Sharma
Water Salute: टीम इंडियाच्या विमानाला 'वॉटर सॅल्युट'; मुंबई विमानतळावरील दृश्य पाहून व्हालं थक्क

हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर हे दोघं क्रीजवर असताना त्यांना 30 धावांची गरज असताना दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होती. त्याचवेळी बुमराहच्या भेदक गोलंदाजीनं टीम इंडियानं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं. त्यामुळं मोदींनी बुमराहला विचारलं की, त्यावेळी त्याच्या मनात काय चाललं होतं? तसंच पंड्याची एकूण कामगिरीबद्दल कशी होती आणि त्यानं शेवटच्या षटकाचं नियोजन कसं केलं? ज्यामुळं दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज पडली.

एका दशकाहून अधिक काळानंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याने सूर्यकुमार, ज्याचा सीमारेषेवरील ॲक्रोबॅटिक झेल सामना जिंकणारा ठरला, त्याला ते जादूई सात सेकंद पुन्हा जिवंत करण्यास सांगितले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com