उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमध्ये एका कुत्र्याने गावातील संपूर्ण कुटुंबाच्या नाकी नऊ आणल्याची अनोखी घटना समोर आली आहे. हा गावठी कुत्रा संपूर्ण गावात इतर कोणालाही चावत नाही, परंतु एका कुटुंबातील कोणीही सदस्य बाहेर दिसला की लगेच चावा घेतो. त्यांना या कुत्र्याची एवढी भीती वाटते की त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबीयांनी स्थानिक उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद मागितली आहे.